अमित सोमवंशी। दि. २७ (उस्मानाबाद)
वीस दिवसांच्या आंदोलनानंतरही सीना-कोळेगाव प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या निर्णयावर शासन ठाम राहिले. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धरणाचे चार दरवाजे उघडून १५00 क्युसेक्स वेगाने सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आले. दरम्यान, या निर्णयाला विरोध करणार्या परंडा तालुक्यातील सर्वपक्षीय १0५ पदाधिकार्यांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, यातील ४४ जणांनी जामीन नाकारला.अमित सोमवंशी। दि. २७ (उस्मानाबाद)
वीस दिवसांच्या आंदोलनानंतरही सीना-कोळेगाव प्रकल्पातून पाणी सोडण्याच्या निर्णयावर शासन ठाम राहिले. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धरणाचे चार दरवाजे उघडून १५00 क्युसेक्स वेगाने सोलापूरसाठी पाणी सोडण्यात आले. दरम्यान, या निर्णयाला विरोध करणार्या परंडा तालुक्यातील सर्वपक्षीय १0५ पदाधिकार्यांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली असून, यातील ४४ जणांनी जामीन नाकारला.
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. हा निर्णय अव्यवहार्य असल्याचे सांगत १५६ किमीवर असलेल्या सदर तालुक्यांना पाणी पोहोचणार नाही, असा आक्षेप घेत पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी सदर निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करीत परंडा तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी या विरोधात आंदोलन सुरू केले होते. यासंदर्भात शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकार्यांची मुंबईत बैठकही घेण्यात आली. मात्र या बैठकीत उस्मानाबाद जिल्ह्यातील पदाधिकार्यांचे म्हणणे ऐकण्याअगोदरच मुख्यमंत्र्यांनी पाणी सोडण्याचे आदेश दिल्याचे सांगत उस्मानाबादमधील सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकत सभागृह सोडले होते.
शनिवारी सायंकाळपासूनच परंडा शहर तसेच सीना-कोळेगाव धरण स्थळावर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. त्यामुळे रविवारी पाणी सोडणार हे निश्चित झाले होते. यानुसार सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हे पाणी सोडण्यात आले. या कृतीच्या निषेधार्थ आंदोलन करणार्या आ. राहुल मोटे, शिवसेनेचे माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, भाजपा प्रदेश चिटणीस सुजीतसिंह ठाकूर, रिपाइंचे प्रदेश चिटणीस संजय बनसोडे, काँग्रेस नेते तथा परंड्याचे उपनगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, माजी जि. प. सभापती रणजीतसिंह पाटील आदींसह कार्यकर्त्यांवर प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई केली.
पाणी सोडल्याच्या तसेच प्रमुख पदाधिकार्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ वाशी तालुक्यातील पारगाव, सरमकुंडी फाटा तसेच पार्डी येथे संतप्त कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
औरंगाबाद। दि. २७
(लोकमत ब्युरो)
हसरूल मध्यवर्ती कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील खतरनाक आरोपी सलीम कुत्ता व त्याच्या गँगने कैदी सचिन तायडे व डॉ. सचिन पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असून, यामध्ये सचिन तायडे हा गंभीर जखमी झाला आहे.औरंगाबाद। दि. २७
(लोकमत ब्युरो)
हसरूल मध्यवर्ती कारागृहात मुंबई बॉम्बस्फोटातील खतरनाक आरोपी सलीम कुत्ता व त्याच्या गँगने कैदी सचिन तायडे व डॉ. सचिन पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असून, यामध्ये सचिन तायडे हा गंभीर जखमी झाला आहे.
दुपारी १२ वाजेच्या सुमारास मोक्का कायद्यांतर्गत शिक्षा भोगत असलेला कैदी पवन शर्मा याने सलीम कुत्ता याच्या इशार्यावरून सचिन तायडे याच्यावर धार लावलेल्या चमच्याने प्राणघातक हल्ला केला. त्यावेळी सचिन तायडे याने त्याच्यावर होणारा हल्ला चुकविण्याचा प्रयत्न केला असता पवन शर्मा याने केलेला वार त्याच्या डाव्या बाजूच्या गळ्यावर बसला. यामध्ये सचिनला १९ ते २0 टाके बसले आहेत. या प्रकरणानंतर तुरुंगाधिकार्यांनी हे प्रकरण बाहेर जाऊ नये यासाठी सचिनवर तुरुंगातच उपचार करण्याचा निर्णय घेतला; मात्र आपणास उपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी हॉस्पिटल) नेले नाही तर भिंतीवर डोके आपटून जीव देईन, अशी सचिन तायडे याने धमकी दिल्यामुळे तब्बल तीन तासांनंतर सचिनला घाटी हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. सचिनच्या गळ्यावर झालेली जखम जवळपास पाच सेंटीमीटर लांब व एक सेंटीमीटर खोल असून, त्याच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास डॉक्टरांच्या पथकाने सचिनच्या जखमेवर टाके घातले व उपचार केला. डॉ. सचिन पवार यास या हल्ल्यात लाथा-बुक्क्याने मारहाण झाली आहे. त्यामुळे त्याला घाटीत आणले नव्हते.
यासंदर्भात ‘लोकमत’शी बोलताना कैदी सचिन तायडे म्हणाला की, हसरूल मध्यवर्ती कारागृहातील सेपरेट अँडमध्ये (सुरक्षा विभाग) खोली क्रमांक ८ मध्ये मी राहतो, तर सलीम कुत्ता हा याच अँडमध्ये खोली क्रमांक ११ मध्ये राहतो. आज सकाळी मी तुरुंगातील दवाखान्यात जात असताना सलीमने त्याच्या खोलीत मोठय़ा आवाजात धार्मिक गाणी लावली होती. खोलीसमोरून जाताना मी सहज त्याच्या खोलीकडे पाहिले.
तेव्हा त्याने मला घाणेरड्या शिव्या दिल्या व ‘तू क्या भाईगिरी कर रहा है क्या’ असे म्हणत माझ्या अंगावर आला. तेव्हा मी नम्रपणे त्याला सांगितले की ‘तुम्हारी गलत फॅमी हो रही है’ वैसा कुच्छ भी नही’. तेवढय़ात तुरुंग कर्मचारी व अधिकार्यांनी येऊन मला खोलीत नेले. त्यानंतर सलीमने बॉम्बस्फोटातील अन्य कैदी व नांदेड येथून मोक्का कायद्यांतर्गत तुरुंगात आलेला पवन शर्मा यांनी माझ्यावर हल्ला करण्याची व्यूहरचना आखली. काही वेळानंतर सलीम कुत्ताने मला तंटा मिटविण्यासाठी बोलावले. जे झाले ते तू विसरून जा, असे तो म्हणत होता. तेवढय़ात पवन शर्मा याने हातातील चमच्याच्या मागील तीक्ष्ण बाजूने हल्ला केला. यातच सचिन तायडे याच्या गळ्यावर मोठी जखम झाली अन् तो रक्ताच्या थारोळ्यात पडला. सचिन तायडेवर सध्या घाटी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
जवळा बाजार। दि.२७(वार्ताहर)
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार शिवारात एक घर फोडून जवळच्या दोन आखाडंय़ावर धुमाकूळ घालत चोरट्य़ांनी महिलांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिणे पळविले. २६ मेच्या रात्री घडलेल्या या घटनेत जवळपास २५ हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे.जवळा बाजार। दि.२७(वार्ताहर)
औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार शिवारात एक घर फोडून जवळच्या दोन आखाडंय़ावर धुमाकूळ घालत चोरट्य़ांनी महिलांना मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिणे पळविले. २६ मेच्या रात्री घडलेल्या या घटनेत जवळपास २५ हजाराचा ऐवज चोरीला गेला आहे.
जवळा बाजार येथील पुरजळ रस्त्यालगत असलेल्या शिक्षक कॉलनीतील चंद्रकांत कदम यांच्याकडे लक्ष्मण रामराव राखोंडे हे किरायाने राहतात.
घरमालक व किरायदार कुटुंबिय गर्मीमुळे घराच्या गच्चीवर झोपलेले असताना २५ ते ३0 वर्षे वयोगटातील ३ चोरट्य़ांनी शनिवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास संरक्षक भिंतीवरून घराच्या आवारात प्रवेश केला. त्यानंतर राखोंडे यांच्या खोलीच्या दरवाजाचे कुलूप तोडले. भिंतीला लटकवलेल्या पॅन्टच्या खिशातून रोख १२ हजार रूपये काढून घेत कपाटातील १ ग्रॅम वजनाचा सोन्याचा ओम, ४ ग्रॅमची १ अंगठी असा एकूण १८ हजाराचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. दरम्यान, कदम यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न सुरू असताना घरमालक व शेजारी राहणार्या उमाकांत दिक्षीत यांना जाग आल्याने चोरटे पसार झाले. त्यानंतर चोरट्य़ांनी आपला मोर्चा हिंगोली रोडवरील शेतातीज पिंटू नवले यांच्या आखाड्याकडे वळवला. त्याठिकाणी बाळू काळे आणि त्यांची पत्नी द्रोपदा काळे यांना मारहाण करून गळ्यातील मंगळसूत्र व हातातील चांदीचे कडे काढून घेतले. तसेच जवळच असलेल्या ओम लाहोटी यांचा आखाडा गाठून तेथील मजूर प्रयागबाई नवले यांना दमदाटी करीत तोंड दाबून त्यांच्या गळ्यातील पोत, चांदीचे कडे असा ऐवज चोरट्य़ांनी पळवला.
चोरी प्रकरणी लक्ष्मण राखोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हट्टा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्य़ांविरूध्द कलम ४५७, ३८0 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आखाड्यांवरील लूटमारीच्या प्रकाराची रविवारी रात्री उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.
चार कर्मचार्यावर चौकीचा भार
औंढा तालुक्यातील २0 हजार लोकसंख्येची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या जवळा बाजार येथे १0 जुलै २00८ रोजी एकाच रात्री बारा दुकाने फोडण्यात आली होती.
त्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक प्रतापसिंह पाटणकर यांनी पोलिस चौकी स्थापन केली. तसेच एका फौजदारासह पाच कर्मचार्यांची नेमणूक केली होती. या चौकीअंतर्गत १0 गावे येतात. सध्या केवळ चार कर्मचारी कार्यरत असल्याने त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे.
पोलिसांची गस्त सुरू असतानाच घडला प्रकार
पोलिस गस्तीवर असतानाच चोरट्य़ांनी शिक्षक कॉलनीतील घर फोडले. मात्र पोलिसांना त्याची खबरबात नव्हती. नागरिकांनी कळविल्यावर जमादार नूरखाँ पठाण, अशोक कांबळे, पोकॉ शंकर हेंद्रे, जीप चालक जाधव घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, रविवारी सकाळी वसमतचे उपविभागीय पोलिस अधिकारी माणिकराव पेरके यांनी जवळा येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. हिंगोलीच्या श्वानपथकासही पाचारण करण्यात आले होते. फौजदार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रॉकी श्वानाने चोरट्य़ांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच ठसे तज्ज्ञ पोलिस उपनिरीक्षक पी.एम.सोनवणे यांनी चोरी झालेल्या घरातील कपाट, डब्बे, लोखंडी रॉडवरील हातांच्या ठशांच्या नोंदी घेतल्या.
उदगीर। दि.२७(वार्ताहर)
येथील १४ वर्षीय बाल कामगाराच्या पार्श्वभागात मोटारी धुण्याच्या कॉम्प्रेसर पाईपने हवा भरल्याच्या आरोपावरुन उदगीर ग्रामीण पोलिसांनी दोघा आरोपीविरुद्ध अँट्रासिटीचा गुन्हा नोंद केला आहे. तसेच बाल कामगार ठेवल्याप्रकरणी टाटा मोटार्सच्या सर्व्हिस सेंटर मालकावरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.उदगीर। दि.२७(वार्ताहर)
येथील १४ वर्षीय बाल कामगाराच्या पार्श्वभागात मोटारी धुण्याच्या कॉम्प्रेसर पाईपने हवा भरल्याच्या आरोपावरुन उदगीर ग्रामीण पोलिसांनी दोघा आरोपीविरुद्ध अँट्रासिटीचा गुन्हा नोंद केला आहे. तसेच बाल कामगार ठेवल्याप्रकरणी टाटा मोटार्सच्या सर्व्हिस सेंटर मालकावरही पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
उदगीर शहराच्या नांदेड रस्त्यावर इच्छापुर्ती हनुमान मंदिराशेजारी टाटा मोटार्सचे सर्व्हिसिंग सेंटर आहे. या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करणार्या १४ वर्षीय बालकामगाराने १४ एप्रिल रोजी सुटी देण्याची मागणी केली. मात्र या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये काम करणारे आरोपी सलीम जावेद पटेल व सलीम शेख याने चिडून मोटारी धुण्याच्या कॉम्प्रेसर पाईपने या बालकामगाराच्या पार्श्वभागात हवा भरली. यामुळे गंभीर जखमी अवस्थेत मृत्यूशी झुंज देत हा बालकामगार तब्बल २५ दिवस रुग्णालयात दाखल होता. उपचार सुरु असताना या बालकामगाराने ११ मे २0१२ रोजी उदगीर ग्रामीण पोलिसांत तक्रार दाखल केल्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला होता.
१६ जून रोजी मोर्चा
या प्रकरणातील आरोपीविरुद्ध अनु:जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन या बालकामगारास ५ लाख रुपयाची मदत देण्यात यावी. तसेच टाटा मोटार्स सर्व्हिसिंग सेंटरच्या मालकावरही गुन्हा दाखल करुन मोकाट आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी उदगीर येथील दलित अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीने १ जून रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
नर्सी नामदेव। दि.२७(वार्ताहर)
खुनाचा बदला घेण्यासाठी ५४ वर्षीय सोपान नवृत्तीराव ढोक यांचे अपहरण करून फाशी देऊन त्यांना जाळण्यात आल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील माहेरखेडा शिवारात १ एप्रिल रोजी घडली. यातील मृताच्या हाडांचे अवशेष घेऊन नर्सी पोलिस डीएनए चाचणीसाठी रविवारी मुंबईला रवाना झाले.नर्सी नामदेव। दि.२७(वार्ताहर)
खुनाचा बदला घेण्यासाठी ५४ वर्षीय सोपान नवृत्तीराव ढोक यांचे अपहरण करून फाशी देऊन त्यांना जाळण्यात आल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील माहेरखेडा शिवारात १ एप्रिल रोजी घडली. यातील मृताच्या हाडांचे अवशेष घेऊन नर्सी पोलिस डीएनए चाचणीसाठी रविवारी मुंबईला रवाना झाले.
याबाबत त्यांचा मुलगा किसन सोपान ढोक याने नर्सी पोलिसात तक्रार दिल्यावर आरोपी नामदेव वामन ढोक, त्र्यंबक ढोक, भानुदास ढोक, ज्ञानोबा विo्रामजी ढोक, विठ्ठल ढोक, माधव ढोक, जेजेराम राजाराम ढोक (सर्व रा. माहेरखेडा), देवराव मोतीराम पवार (रा.वरूड समद) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
दुहेरी खुनाचा बदला..
अकोला येथे राहत असलेला सोपान ढोक याने १९८४ साली माहेरखेडा (ता.सेनगाव जि.हिंगोली) शिवारात विo्राम ढोक आणि वामन ढोक यांचा शेतीच्या वादातून खून केला होता. या गुन्ह्यात त्याच्यासह १३ आरोपींना दहा वर्षाचा कारावास झाला होता. शिक्षा भोगून परत आल्यापासून दुहेरी खुनातील मृतांचे नातेवाईक बदला घेण्यासाठी टपून बसलेले होते. ३१ मार्च रोजी सोपान ढोक हा अकोल्याहून आलेला असताना पुसेगाव बसथांब्यावरून त्याला माहेरखेडा शिवारात पळवून नेण्यात आले. त्याच दिवशी दुपारी माहेरखेडा गावापासून २ किमी अंतरावरील शेतात गळफास लावून सोपान ढोक यास जीवे मारण्यात आले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचे प्रेत जाळून टाकण्यात आल होते. प्रेत जाळले त्या ठिकाणाहून हाडे मिo्रीत माती, साधी माती, हरभर्याचे जळालेले कुटार तपासकामी पोलिसांनी जप्त करून डीएनए चाचणीसाठी ताब्यात घेतले. प्रभारी पोलिस अधीक्षक रमेश जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी माणिकराव पेरके यांच्या मार्गदर्शनाखाली नर्सीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश शर्मा, जमादार शेख जलील हे डीएनए चाचणीसाठी मुंबईला रवाना झाले.
कमलाकर जोशी। दि.२७ (नांदेड)
गेल्या पाच दशकांपासून कूळ कायद्याचा प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित होता. राज्य शासनाने या कायद्यात बदन करून या जमिनीची खरेदी-विक्री करण्यासाठी जिल्हाधिकार्यांची पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय २ मे २0१२ घेतला आहे.कमलाकर जोशी। दि.२७ (नांदेड)
गेल्या पाच दशकांपासून कूळ कायद्याचा प्रश्न राज्य शासनाकडे प्रलंबित होता. राज्य शासनाने या कायद्यात बदन करून या जमिनीची खरेदी-विक्री करण्यासाठी जिल्हाधिकार्यांची पूर्वपरवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय २ मे २0१२ घेतला आहे.
कूळ कायद्याचा जन्म १९४४ मध्ये झाला. मुंबई कूळ वहीवाट व शेतजमीन अधिनियम कायदा त्यावेळी तयार केला गेला, परंतु यातून कुळाचे प्रश्न सुटलेले नाहीत. उलट खोतांना अधिकच महत्त्व येवून संरक्षण प्राप्त झाले. त्यानंतर १९५७ मध्ये कूळ कायदा मंजूर झाला.; पण तोसुद्धा प्रभावी ठरला नाही. आज कुळाच्या जमिनी ताब्यात असूनही ती परत मिळण्याची शक्यता नसल्याने एजंटामार्फत तिची विक्री करून पैसे परस्पर लाटण्याचे उद्योग दलालांनी सुरू केले आहेत. बेदखल कुळाच्या मालकी हक्काबाबत दाखविलेल्या अनास्थेमुळे कोकणातील जवळपास एक लाखाहून अधिक प्रश्न गेल्या ५३ वर्षांपासून लोंबकळत पडले आहेत. १९५७ मध्ये ‘खोती पद्धती’ रद्दबातल करणारा आणि कुळांना मालकी हक्क प्राप्त करून देणारा कायदा मंजूर करण्यात आला होता, परंतु हा कायदा कागदावरच राहिला.
जानेवारी २00१ मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या काळात या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार कायद्यातील ७ (ब) यात दुरुस्ती करून गावाचा सरपंच, पोलिस पाटील, कूळ कसत असलेल्या जमिनीलगतच्या कब्जेदार शेतकरी, गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती या सर्वांची प्रतिज्ञापत्रे व ग्रामपंचायतचा ठराव आदी पाच पुरावे सादर केली तरच कुळाची वहिवाट नोंदणी करून घ्यावी, असे शासनाने आदेश दिले होते. ही दुरुस्ती अंमलात येवूनही हजारो खटले जिल्हाधिकार्यांसमोर दाखल झाले, परंतु सरपंच आणि पोलिस पाटील आणि लगतचा कब्जेदार शेतकरी व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या साक्षी नोंदविण्यास अनेक अडचणी येऊ लागल्या. म्हणून पुन्हा २00४ मध्ये यात सुधारणा करण्यात आली.
पुणे येथे झालेल्या पाचव्या बहुभाषिक ब्राह्मण अधिवेशनात १९५७ च्या कूळ कायद्याचे पुनर्विलोकन करण्याचा ठराव काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी मांडून मागणी केली होती, हे वेगळेच.
तर दुसरीकडे राज्य शासनाने कूळ कायद्याच्या प्रश्नासंबंधात अनेक त्रुटी असल्यामुळे २ मे २0१२ रोजी या कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई कुळवाट शेतजमिनीच्या कायद्यानुसार मिळालेली जमीन जिल्हाधिकार्यांच्या पूर्वमंजुरीशिवाय विक्री करून, देणगी देवून, अदलाबदल करून, गहाण देवून किंवा पट्टय़ाने देवून हस्तांतरित करता येत नव्हते. त्यामुळे विक्री परवानगीची प्रचलित प्रक्रिया सुरू व्हावी, खातेदारांच्या जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार विलंब न करता पूर्ण करता यावे, या उद्देशाने जिल्हाधिकार्यांच्या पूर्वपरवागनीची अट राज्य शासनाने शिथिल केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची देणगी
स्वातंत्र्यपूर्व काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेसच्या मुंबई राज्याच्या विधानसभेत कोकणातील जमिनीच्या मालकी हक्कासंबंधात हे विधेयक आणले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोकणातील भूमिपुत्रांना या विधेयकाच्या माध्यमातून मोठी देणगीच मिळवून दिली.
जालना। दि.२७(प्रतिनिधी)
सर्मथ रामदास स्वामींचे जन्मठिकाण असलेल्या जांब सर्मथ (ता. घनसावंगी, जि. जालना) येथे ग्रंथराज श्रीमद् दासबोध पारायण दशकपूर्ती महोत्सव २ ते १0 जून या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त धार्मिक, संगीत-गायन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.जालना। दि.२७(प्रतिनिधी)
सर्मथ रामदास स्वामींचे जन्मठिकाण असलेल्या जांब सर्मथ (ता. घनसावंगी, जि. जालना) येथे ग्रंथराज श्रीमद् दासबोध पारायण दशकपूर्ती महोत्सव २ ते १0 जून या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त धार्मिक, संगीत-गायन, प्रवचन, कीर्तन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
गं्रथराज दासबोध पूजन व उद्घाटनाचा कार्यक्रम ज्येष्ठ तपस्वी संत सर्मथभक्त हरिहरानंदजी स्वामी (बलिया, उत्तरप्रदेश) यांच्या उपस्थितीत होत आहे. दासबोध पारायणाचे प्रमुख वाचक आहेत शहाजीबुवा रामदासी (मठाधिपती, श्रीराममंदिर, तेर). श्री सर्मथ दरबारमध्ये मानसी जोशी, गयाबाई महाराज जावळे, नम्रता व्यास, भालचंद्र सरदेशपांडे, प्रज्ञा कुलकर्णी, संगीता श्रोत्री, उषा चंद्रात्रेय यांची सेवा रुजू होणार आहे.
कीर्तन सेवेत विश्वास कुलकर्णी, गोविंद महाराज दिंडोरीकर, विष्णुपंत महाराज महाजन बनशेंद्रेकर, श्रीरामबुवा रामदासी, चारुदत्त आफळे यांची सेवा रुजू होईल. या सर्व कार्यक्रमांना शरद खाडिलकर, देवीदास कुलकर्णी व गिरीश सातोनकर साथसंगत करतील. प्रवचन सेवेमध्ये महेशचंद्र कवठेकर, धनंजय देशपांडे, भागवताचार्य नागनाथशास्त्री कोटगीरकर, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, एकनाथ महाराज पुजारी, मधुसूदन बोपोर्डीकर, संजय पिंपळगावकर साळेगावकर यांची सेवा रुजू होईल. दररोज सकाळी १0.३0 ते १२ या कालावधीत सर्मथ दरबार, दुपारी ४ ते ५.१५ या कालावधीत प्रवचन सेवा, सायंकाळी ५.३0 ते ७.३0 या काळात संगीत गायन सेवा व रात्री ८.३0 ते १0.३0 या काळात कीर्तन सेवा होईल. जांब सर्मथ येथील सर्मथ मंदिरामध्ये निवास व प्रसादाची सोय केली आहे. पारायणासह सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गिरीश सातोनकर यांनी केले आहे.
कंधार। दि.२७ (वार्ताहर)
राष्ट्रकुट राजवंशाने इ.स.७५७ पासून इ.स. ९७४ पर्यंत दक्षिण भारतावर राज्य केले. राष्ट्रकुट राजा अमोघ वर्ष पहिला (इ.स. ८१४-८७८) हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. जैन आचार्य जिनसेन हे अमोघ वर्ष पहिला यांचे गुरू होते. तेव्हा कंधारात ४0 जैन मंदिरे होती. राष्ट्रकुट काळात जैन धर्माला राजाश्रय दिला होता. म्हणून जैन धर्मासाठी तो सुवर्णकाळ होता, अशी माहिती इतिहास संशोधक प्रा.डॉ.अनिल कठारे यांनी दिली.कंधार। दि.२७ (वार्ताहर)
राष्ट्रकुट राजवंशाने इ.स.७५७ पासून इ.स. ९७४ पर्यंत दक्षिण भारतावर राज्य केले. राष्ट्रकुट राजा अमोघ वर्ष पहिला (इ.स. ८१४-८७८) हे धार्मिक प्रवृत्तीचे होते. जैन आचार्य जिनसेन हे अमोघ वर्ष पहिला यांचे गुरू होते. तेव्हा कंधारात ४0 जैन मंदिरे होती. राष्ट्रकुट काळात जैन धर्माला राजाश्रय दिला होता. म्हणून जैन धर्मासाठी तो सुवर्णकाळ होता, अशी माहिती इतिहास संशोधक प्रा.डॉ.अनिल कठारे यांनी दिली.
कंधारला राष्ट्रकुटांनी राजधानीचा दर्जा दिला. तेव्हा येथील व्यापार भरभराटीस आला होता. कापड, सतरंजी, तांबे व मातीची भांडे, चुना, मीठ, तेल, मातीची खेळणी आदी येथून निर्यात केले जात होते. अनेक उद्योग चालत होते. तसेच इतिहास व संस्कृतीचा वारसा, विद्वानाची, दानशूर, पंडितांची नगरी होती. उपलब्ध साहित्य व शिलालेखावरून जैन इतिहास, जैन धर्माची महती समजते. राष्ट्रकुट राजे धर्माचे पुरस्कर्ते होते.
जैन आचार्य जिनसेन हे अमोघ वर्ष पहिला यांचे गुरू होते. आचार्य गुणभद्र हे कृष्ण दुसराचे गुरू होते. म्हणूनच नांदेडसह जिल्ह्यातील कंधार, अर्धापूर, मानसपुरी, बहाद्दरपुरा, लालवाडी, सगरोळी, मुखेड, बिजेवाडी आदी ठिकाणी प्राचीन जैनशिल्प आहेत. कंधार येथे ४0 जैन मंदिरे होती. काळाच्या ओघात अनेक नष्ट झाली, परंतु शहरात वसई भागात आजही एक जैन मंदिर भग्नावस्थेत आहे. या मंदिराला श्री १00८ पार्श्वनाथ (कमठेश्वर पार्श्वनाथ) म्हटले जाते. या मंदिराचा आधुनिक पद्धतीने जीर्णोद्धार केला आहे. आतील सर्व मूर्तिशिल्पे व प्रतिमा प्राचीन कलावैभवाची साक्ष देतात. २४ तीर्थंकर एकत्रितपणे कंधार येथेच अपवादाने आढळतात. त्या पाषाण, संगमरवरी व धातूच्या मूर्ती आहेत. पंच पार्श्वनाथ, क्षेत्रपालाच्या ४ मूर्ती आहेत. याच मंदिरात ६ हस्तलिखित दप्तरे सुरक्षितपणे ठेवलेली आढळतात. पोथीपुराणही आहे. हस्तलिखितात येथील आर्थिक, सामाजिक स्थितीचे वर्णन असून बाजारपेठ, वस्तूच्या भावांच्या नोंदी आहेत. इतिहास संशोधकांना हे दस्तऐवज उपयुक्त ठरणार आहेत.
पार्श्वनाथ मंदिरासमोर एक लादणी (भुयार) आहे. या भुयारात वृषभनाथ मंदिर आहे. पाषाणात घडविलेली वृषभनाथाची मूर्ती आहे. येथेच सहस्त्रबिंब आहे. त्यावर एक हजार जैन मूर्तिशिल्पे आहेत. वर्धमान महावीरांची पाषाणात घडविलेली मूर्ती येथे जशी आहे, तसेच एक क्षेत्रपाल व वृषभनाथ मूर्ती आहे. पार्श्वनाथ व वृषभनाथ मंदिरे ही राष्ट्रकुट सम्राट अमोघ वर्ष यांच्या काळातील आहेत. ती जागृत मानली जातात.
भक्तिभावाने सर्वधर्मीय येथे नवस फेडण्यासाठी येतात. एके काळी जैन वस्ती बहुबल असणारा हा भाग. जैन, पहाडे व बिडवई असे बोटावर मोजण्याइतपत कुटुंब पिढय़ान्पिढय़ांपासून राहतात. अभय पहाडे, प्रदीप जैन, सुधीर बिडवई, राजहंस शहापुरे, गंगाधर मांगुळकर, विजय वधनू मांगूळकर यांनी या मंदिराचे जतन केले आहे. मंदिराची देखभाल अलका प्रदीप जैन या करतात. राष्ट्रकुट काळातील या मंदिराचा जीर्णोद्धार आधुनिक पद्धतीने करण्याची गरज आहे. जैन समाज राज्यात व्यापार, उद्योग राजकारणात आपला स्वतंत्रपणे ठसा उमटवितात. त्यांनी येथील मंदिरासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
शहर व परिसरात अनेकदा खोदकामात मूर्ती आढळतात. त्यात सर्वाधिक जैन मूर्तीचा समावेश असतो. शहरालगत चरणमुनीचा माळ आहे. तेथे जैनमुनींच्या दोन समाधी आहेत. येथे मंदिर अवशेष आढळतात. तसेच चरण पादुका आहेत. राष्ट्रकुट राजांनी गुरूच्या सन्मानार्थ त्यांच्या समाध्या चरणपादुका बांधून पदकमलाची पूजा केली असावी, अशी शक्यता डॉ.अरुणा काला व डॉ.अनिल कठारे यांनी आपल्या पुस्तकात व्यक्त केली आहे. हा ठेवा जपण्यासाठी आता सर्व स्तरांतून प्रयत्नांची गरज आहे.
उस्मानाबाद/परभणी। दि. २७ (प्रतिनिधी)
विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली व उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २८ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार असून ११ वाजेपर्यंत निकाल हाती येणे अपेक्षित आहे.उस्मानाबाद/परभणी। दि. २७ (प्रतिनिधी)
विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली व उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीसाठी २८ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार असून ११ वाजेपर्यंत निकाल हाती येणे अपेक्षित आहे.
परभणी-हिंगोली मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीचे बाबाजानी दुर्राणी आणि अपक्ष उमेदवार ब्रिजलाल खुराणा यांच्यात सरळ लढत झाली. दरम्यान, सोमवारी होणार्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात ही मतमोजणी होईल.
उस्मानाबाद-लातूर-बीड मतदारसंघातील एकूण ७४१ पैकी ७३८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तहसील कार्यालयाच्या महसूल भवनामध्ये होणार्या मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी २00 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. या मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आ. दिलीप देशमुख व अपक्ष उमेदवार सुधीर कुलकर्णी अशी दुरंगी लढत झाली आहे.