अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याच्या कारणावरून;
आईला अटक
कोल्हापूर, दि.27 (प्रतिनिधी)र् अनैतिक संबंधाला अडसर व विरोध करत असल्याच्या कारणावरून कनानगरात तरुणाचा खून झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. वासीम अमीर सुतार (वय 24, रा. कनाननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी वासीमची आई हसिना ऊर्फ रझिया अमीर सुतार (वय 45. रा. कनाननगर) हिला शाहूपुरी पोलिसांनी आज दुपारी अटक केली असून उर्वरित तीन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान,रझियाला न्यायालयाने एक जूनर्पयत पोलीस कोठडी दिली.अनैतिक संबंधाला विरोध करत असल्याच्या कारणावरून;
आईला अटक
कोल्हापूर, दि.27 (प्रतिनिधी)र् अनैतिक संबंधाला अडसर व विरोध करत असल्याच्या कारणावरून कनानगरात तरुणाचा खून झाल्याची घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. वासीम अमीर सुतार (वय 24, रा. कनाननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी वासीमची आई हसिना ऊर्फ रझिया अमीर सुतार (वय 45. रा. कनाननगर) हिला शाहूपुरी पोलिसांनी आज दुपारी अटक केली असून उर्वरित तीन संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान,रझियाला न्यायालयाने एक जूनर्पयत पोलीस कोठडी दिली.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, रझिया सुतार ही मूळची कुडशी (ता. कराड) येथील वासीम हा तिचा एकुलता एक मुलगा. पतीच्या निधनानंतर रझिया ही मुलांसह कनाननगर येथे राहावयास काही वर्षापूवी राहावयास आली. वासीम हा मजुरी करून घर चालवत होता. दोन वर्षापूर्वी त्याचा पूनम नावाच्या मुलीशी प्रेमविवाह झाला. या प्रेमविवाहाला रझियाचा विरोध होता. त्यामुळे वासीम हा पत्नीसमवेत याचठिकाणी वेगळा राहत होता. वासीमला आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याचे माहीत झाल्यानंतर तो अस्वस्थ झाला.
काल (शनिवारी) रझिया ही ‘पाप्या’याच्या दुचाकीवरून कनाननगर येथे रात्री साडेअकराच्या सुमारास आली. त्यावेळी वासीम व त्याची पत्नी पूनम ही कट्टय़ावर बसली होती. रझिया व ‘पाप्या’ हे दोघेजण खोलीमध्ये गेले व ते कडी लावून आत बसले. हा प्रकार बघितल्यानंतर वासीमचा पारा चढला. त्याने रागाच्या भरात दारावर जाऊन लाथ मारली. ‘तू आमच्या घरात का येतोस, अशी विचारणा वासीमने पाप्याकडे करून त्याला शिवीगाळ केली. यावरून दोघांच्यात वाद झाला. यावेळी आई रझिया हिने काठीने वासीमला मारहाण करून घरातून हाकलून दिले.
‘पाप्या’ने थोडय़ा वेळाने आपल्या साथीदारांना फोनवरून याठिकाणी बोलावून घेतले. थोडय़ा वेळानंतर ‘पाप्या’चे साथीदार दुचाकीवरून या ठिकाणी आले. घरात पत्नीसमवेत बसलेल्या वासीमला बाहेर ओढत त्यांनी काठी, फावडय़ाने मारहाण करण्यास सुरुवात केली. पूनम त्यांना अडवण्यासाठी गेली असता तिच्यावर पाप्यासह साथीदारांनी काठीने मारहाण केली तर वासीमच्या पोटात चाकू मारला. त्यात वासीम हा गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर हल्लेखोर दुचाकीवरून पळून गेले.
आईनेच काढला मुलाचा काटा ?
आई रझिया सुतार हिचे वागणे व्यवस्थित नव्हते. त्यामुळे मृत वासीमबरोबर तिचे वारंवार भांडण व्हायचे. आईचे अनैतिक संबंध असल्याचे वासीमला माहीत झाले. रझियानेही आपल्या अनैतिक संबंधात वासीम हा अडसर ठरत होता. त्यामुळेच आईनेच वासीमचा काटा काढला असल्याची चर्चा यावेळी नागरिकांतून होत होती.
तिघांचा शोध सुरू..
मृत वासीमची पत्नी पूनम सुतार हिने शाहूपुरी पोलिसांत याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणी आई रझिया सुतार, पाप्या (पूर्ण नाव नाही) व अनोळखी दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस रात्री उशिरार्पयत या संशयितांचा शोध घेत होते. मात्र, त्यांची नांवे समजू शकली नाहीत. दरम्यान, वासीमच्या शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह आज दुपारी कुडशी गावी नेण्यात आला.
‘स्वामी विवेकानंद’ नोकरभरती गैरव्यवहार प्रकरणी आर. आर. पाटील यांची ग्वाही; शारंगधर देशमुखविषयी बोलणे टाळले
कोल्हापूर । दि. 27 (प्रतिनिधी)
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील नोकरभरतीतील गैरव्यवहार प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री व संस्थेचे अध्यक्ष आर. आर. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नोकरभरती प्रकरणात महापालिकेचे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्यावर आरोप आहेत. ते तुमचे नातेवाईक असल्याचे प्रत्येकाला सांगतात, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मंत्री पाटील यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले.‘स्वामी विवेकानंद’ नोकरभरती गैरव्यवहार प्रकरणी आर. आर. पाटील यांची ग्वाही; शारंगधर देशमुखविषयी बोलणे टाळले
कोल्हापूर । दि. 27 (प्रतिनिधी)
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील नोकरभरतीतील गैरव्यवहार प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री व संस्थेचे अध्यक्ष आर. आर. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. नोकरभरती प्रकरणात महापालिकेचे स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांच्यावर आरोप आहेत. ते तुमचे नातेवाईक असल्याचे प्रत्येकाला सांगतात, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता मंत्री पाटील यांनी यावर भाष्य करण्याचे टाळले.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी गृहमंत्री पाटील आज कोल्हापुरात दुपारी आले. सर्किट हाऊस येथे सायंकाळी पत्रकारांशी ते बोलत होते. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा नोकरभरतीचा प्रश्न सध्या गाजत आहे. स्थायी सभापती शारंगधर देशमुख या प्रकरणात संशयित असून, त्यांचा उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. तरीही, पोलीस कारवाईत टाळाटाळ होत आहे, याबाबत विचारले असता आर. आर. पाटील म्हणाले, नोकरभरती प्रकरण माहिती आहे. पोलीस व शिक्षण संस्था याची चौकशी करत आहेत. पोलिसांचा तपास सुरू आहे. जे यामध्ये दोषी असतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल. देशमुख यांच्या गाडीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते? असा प्रश्न विचारला असता याची मी चौकशी करतो, असे गृहमंत्री पाटील यांनी सांगितले.
खासगी सावकारीबद्दल ते म्हणाले, विधानसभेत खासगी सावकारीविरुद्ध विधेयक पास झाले आहे. केंद्राकडे ते मंजुरीसाठी पाठविण्यात आले. हे विधेयक मंजूर झाले तर सावकारांनी मूळ मालकांकडून जबरदस्तीने घेतलेल्या जमिनी परत मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. महाराष्ट्रात यापूर्वी 2100 खासगी सावकारांवर सरकारने कारवाई केली आहे.
देशाच्या नक्षलवाद चळवळीबद्दल ते म्हणाले, या चळवळीच्या कारवाया रोखण्यासाठी सीआरपीएफची मदत घेतली आहे. त्यामुळे या चळवळी कमी होत आहेत. दुष्काळग्रस्तांतील त्रुटी प्रशासनाने कमी केल्या आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे, असे एका प्रश्नाला उत्तर देताना गृहमंत्री आर. आर. पाटील म्हणाले.
बुधवारी पाणी मिळण्याची शक्यता
कोल्हापूर । दि. 27 (प्रतिनिधी)
शिंगणापूर योजनेच्या चंबुखडी येथील मुख्य वितरण नलिकेस गळती उद्भवल्याने उद्या (सोमवार) व मंगळवारी (दि.29) कोल्हापूर शहरासह काही उपनगरांत पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे दोन दिवस पाण्यासाठी भटकावे लागणार आहे. बुधवारी (दि. 30) पाणी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे जल अभियंत्यांसह अन्य अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल फोन बंद होते.बुधवारी पाणी मिळण्याची शक्यता
कोल्हापूर । दि. 27 (प्रतिनिधी)
शिंगणापूर योजनेच्या चंबुखडी येथील मुख्य वितरण नलिकेस गळती उद्भवल्याने उद्या (सोमवार) व मंगळवारी (दि.29) कोल्हापूर शहरासह काही उपनगरांत पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे दोन दिवस पाण्यासाठी भटकावे लागणार आहे. बुधवारी (दि. 30) पाणी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे जल अभियंत्यांसह अन्य अधिकार्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे मोबाईल फोन बंद होते.
चंबुखडी (ता. करवीर) येथील मुख्य वितरण नलिकेची गळती काढण्याचे काम उद्यापासून हाती घेण्यात येणार आहे. गळती काढण्याचे काम दोन दिवस चालणार असल्याने साळोखेनगर टाकी परिसर, बापूरामनगर, रामानंदनगर, रायगड कॉलनी, राजेंद्रनगर, पोवार कॉलनी, एल.आय.सी. कॉलनी, वाय. पी. पोवारनगर, जवाहरनगर, आदी उपनगरांसह शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, कावळा नाका, कदमवाडी परिसर, शिवाजी पार्क, एम.जे.पी ऑफिसच्या मागील परिसर या ठिकाणी पाणी येणार नसल्याचे पाणीपुरवठा विभागातून सांगण्यात आले.
दरम्यान, दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करून पाणीपुरवठा विभागाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
कागल । दि. 27 (प्रतिनिधी)
20 वर्षे आमदारकी, 15 वर्षे खासदारकी असताना मंडलिकांनी जनतेची किती कामे केली आणि मी 15 वर्षे आमदार व 10 वर्षे मंत्री म्हणून जनतेची किती कामे केली याची तुलना करूनच हमीदवाडा साखर कारखान्यासाठी मतदान करा. मंडलिक हे या निवडणुकीतही जातीयवाद, आजारीपणाचे नाटक असे कुभांड रचतील आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. सभासदांनी आता सावध राहावे, असे आवाहन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.कागल । दि. 27 (प्रतिनिधी)
20 वर्षे आमदारकी, 15 वर्षे खासदारकी असताना मंडलिकांनी जनतेची किती कामे केली आणि मी 15 वर्षे आमदार व 10 वर्षे मंत्री म्हणून जनतेची किती कामे केली याची तुलना करूनच हमीदवाडा साखर कारखान्यासाठी मतदान करा. मंडलिक हे या निवडणुकीतही जातीयवाद, आजारीपणाचे नाटक असे कुभांड रचतील आणि सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतील. सभासदांनी आता सावध राहावे, असे आवाहन कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
येथील अलका शेतीफॉर्मवर कागल शहरातील सभासदांचा मेळावा आज झाला, तेव्हा ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबूराव पाटील, आनूरकर होते. युवराज पाटील, प्रवीणसिंह भोसले, प्रदीप पाटील-भुयेकर, अरुण पाटील, नगराध्यक्षा माधुरी नाळे, नावीद मुश्रीफ उपस्थित होते. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, हमीदवाडा साखर कारखान्यात संचालक हे चहा आणि मारी बिस्किटांचे मालक आहेत. मंडलिक हे आपल्या पाहुण्याला घेऊन एकतंत्री कारभार करतात. कारखान्याने खरेदी केलेल्या मालाची रक्कम जास्त व विक्री केलेल्याची किंमत कमी, असा अहवाल लेखापरीक्षणात आला आहे. मंडलिकांनी शेतकरी व सभासदांची लूट केली आहे. हा कारखाना कागल तालुक्याच्या मालकीचा ठेवायचा असेल तर हीच एकमेव संधी आहे, अन्यथा संस्थापक सभासदांचे अस्तित्व तेथे दिसणार नाही. कर्नाटकातील पै-पाहुणे यांचा ऊस आणून मंडलिकांनी आपले इरादे दाखवून दिले आहेत.
मुरगूडचे प्रवीणसिंह पाटील म्हणाले की, या कारखान्यात पहिल्या संचालक मंडळात आमचे बंधू होते. गत निवडणुकीत आमची ताकद मंडलिकांना दिली. आता त्याच्या दुप्पट ताकद मुश्रीफांना देऊ. मंडलिकांचे अनेक रुपांतील बहुरुपी धोरण यावेळीही येईल, ते हाणून पाडूया.
भैया माने यांनी स्वागत व प्रास्ताविक, तर रूपचंद चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. रघुनाथ जकाते यांनी आभार मानले.
सरपंच विलास संकपाळ यांचा इशारा
सेनापती कापशी । दि. 27 (वार्ताहर)
माद्याळ (ता. कागल) येथील भावेश्वरी पाणी वापर संस्थेच्या वाटय़ाला मिळालेले पाणी हे कृष्णा खोरे पाणी वाटप लवादाच्या निर्णयाप्रमाणे मिळाले आहे. शासनाचा रितसर परवाना घेऊन पाणी वापर संस्थेचे काम चालू आहे. त्यामुळे विरोधात आंदोलन करणार्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे प्रतिपादन माद्याळचे माजी सरपंच विलास संकपाळ यांनी माद्याळ येथे पत्रकाराशी बोलताना केले.सरपंच विलास संकपाळ यांचा इशारा
सेनापती कापशी । दि. 27 (वार्ताहर)
माद्याळ (ता. कागल) येथील भावेश्वरी पाणी वापर संस्थेच्या वाटय़ाला मिळालेले पाणी हे कृष्णा खोरे पाणी वाटप लवादाच्या निर्णयाप्रमाणे मिळाले आहे. शासनाचा रितसर परवाना घेऊन पाणी वापर संस्थेचे काम चालू आहे. त्यामुळे विरोधात आंदोलन करणार्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, असे प्रतिपादन माद्याळचे माजी सरपंच विलास संकपाळ यांनी माद्याळ येथे पत्रकाराशी बोलताना केले.
यावेळी संकपाळ म्हणाले, आंदोलन करणारे काही मूठभर लोक हे या पाणी वापर संस्थेच्या योजनेच्या वरच्या गावातील आहेत. धामणे, झुलपेवाडी व पिंपळगाव गावातील आंदोलन करणार्यांनी कुणाच्यातरी सांगण्यावरून या पाणी योजनेस राजकीय वळ लावण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या गावातून बेलेवाडी काळम्मातून या पाणी योजनेचे काम सुरू आहे तेथील व त्याखालील ग्रामस्थांचा विरोध नसताना काही विघ्नसंतुष्ट लोक या योजनेस विरोध करत आहेत. 2001 मध्ये कृष्णा लवादामार्फत कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत पाटबंधारे खात्यातील अधिकारी व कागल तालुक्यातील राजकीय नेते उपस्थित होते. या बैठकीत कर्नाटकच्या वाटय़ाला जाणारे पाणी उचलण्याचा निर्णय झाला. यानुसार चिकोत्रा खोर्यातील दहा पाणी वापर संस्थांना परवानगी दिली.
त्यापैकी दोन संस्था कार्यान्वित झाल्या. शासनाने त्रिसदस्यीय समिती नेमून आठ संस्थेचे परवाने रद्द केले आहेत. असा अहवाल असताना आंदोलक शेतकर्यांची दिशाभूल करत आहेत, असे ते म्हणाले.
जयसिंगपूर । दि. 27 (प्रतिनिधी)
शहरात चोरीचे सत्र सुरूच आह़े दीपनगर एमएसईबी कॉलनीतील बंगला फोडून चोरटय़ांनी पाऊण लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना आज (रविवार) सकाळी उघडकीस आली़ या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आह़ेजयसिंगपूर । दि. 27 (प्रतिनिधी)
शहरात चोरीचे सत्र सुरूच आह़े दीपनगर एमएसईबी कॉलनीतील बंगला फोडून चोरटय़ांनी पाऊण लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना आज (रविवार) सकाळी उघडकीस आली़ या घटनेमुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण आह़े
सांगली-कोल्हापूर महामार्गावरील दीपनगर एमएसईबी कॉलनीत प्लॉट नंबर 29 मध्ये शांतिनाथ भरमाप्पा हुक्किरे यांचा बंगला आह़े कामानिमित्त हुक्किरे कुटुंबीय शनिवारी चिपळूणला गेले होत़े बंद बंगला असल्याचा फायदा घेऊन मध्यरात्रीच्या सुमारास चोरटय़ांनी प्रथम शटरचे कुलूप बनावट चावीने उघडल़े त्यानंतर मुख्य दरवाजाचा सेंटर लॅक तोडून बंगल्यात प्रवेश केला़ चोरटय़ांनी प्रथम लाकडी कपाट फोडून साहित्य विस्कटले. त्यानंतर पहिल्या मजल्यावरील लोखंडी कपाट कटावणीने उचकटल़े सोने-चांदीचे दागिने असलेला सुमारे पाऊण लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लांबविला़ चोरटय़ांनी कुलूप बंद असणारे फ्लॅट, बंगले टार्गेट केले आहेत़ लागोपाठ चोरीच्या घटना घडत असल्याने चोरटे स्थानिक असल्याची चर्चा परिसरात आहे.
चंदगड । दि. 27 (प्रतिनिधी)
चंदगडला आज (रविवार) नळाचे पाणी मिळाले नाही. तब्बल 5 कोटी रुपये खर्चाची पाणी योजना भारत निर्माण योजनेतून चंदगडसाठी रा. नि. मं. कार्याध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी मिळवून दिली. मात्र, वारंवार या योजनेचा बोजवारा उडत आहे. नुकतीच माजी जि. प. सदस्य हळदणकर यांनी चौकशीची मागणी केली आहे.चंदगड । दि. 27 (प्रतिनिधी)
चंदगडला आज (रविवार) नळाचे पाणी मिळाले नाही. तब्बल 5 कोटी रुपये खर्चाची पाणी योजना भारत निर्माण योजनेतून चंदगडसाठी रा. नि. मं. कार्याध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांनी मिळवून दिली. मात्र, वारंवार या योजनेचा बोजवारा उडत आहे. नुकतीच माजी जि. प. सदस्य हळदणकर यांनी चौकशीची मागणी केली आहे.
या योजनेची कार्यवाही दोन वर्षामागे झाली. अल्पावधीत योजना कार्यान्वित केल्यामुळे चंदगड शहरवासीय सुखावले खरे. मात्र, दोन वर्षानंतर म्हणजेच सध्या या पाणी योजनेतील पाणी समस्याच ठरली आहे. महिन्यातून एकदा-दोनदा पाणीपुरवठा खंडित होतो. सातत्याने मोटारीचा बिघाड होणे, पाईप लिकेज होणे, मोटारपंप बिघडणे. यातील एका कारणाने पुन्हा आज चंदगड शहराला पाण्याची समस्या निर्माण झाली. त्यामुळे दिवसभर पाण्यासाठी महिलांना दहादिशा फिरावे लागले. वारंवार निर्माण होणार्या पाणी समस्येची चौकशी होणे गरजेचे आहे.
अरुण मराठे यांचे ऊस पीक चर्चासत्रात आवाहन
शिरढोण। दि. 27 (वार्ताहर)
आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळावे. मात्र, शेतीमध्ये आधुनिक व व्यावसायिकतेचा स्वीकार करून चिरंतर शेतीसाठी सेंद्रिय शेतीकडे अधिक भर देण्याचे आवाहन कोल्हापूर कृषी विद्यालयातील अधिकारी अरुण मराठे यांनी केले.अरुण मराठे यांचे ऊस पीक चर्चासत्रात आवाहन
शिरढोण। दि. 27 (वार्ताहर)
आजच्या तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता शेतीकडे वळावे. मात्र, शेतीमध्ये आधुनिक व व्यावसायिकतेचा स्वीकार करून चिरंतर शेतीसाठी सेंद्रिय शेतीकडे अधिक भर देण्याचे आवाहन कोल्हापूर कृषी विद्यालयातील अधिकारी अरुण मराठे यांनी केले.
जांभळी (ता. शिरोळ) येथे दत्त सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित ऊस पीक चर्चा सत्राप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक कृषिपंडित गणपतराव पाटील होते.
मराठे यांनी, शेतीच्या सुरक्षितेबरोबरच उत्पादन वाढीसाठी प्रत्येक शेतकर्यांनी माती परीक्षण करूनच पिकानुसार आवश्यक घटकांचा डोस देण्याची गरज असल्याचे सांगितले. कारखान्याचे ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव यांनी, ऊस पीक पाने परीक्षण, रासायनिक खतांचे प्रमाण, हिरवळीचे खत, कीटकनाशक, आदी
वापरांबाबत माहिती दिली. शेतकरी अण्णासाहेब पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
चर्चासत्रात जांभळी, टाकवडे, शिरढोण, हरोली, कोंडिग्रे, नांदणी, यड्राव परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेती अधिकारी मारिओ कोरिया, विलास पाटील, सदाशिव देसाई, जयसिंग जाधव,
उपस्थित होते. अण्णासाहेब पाटील यांनी आभार मानले.