M4मराठी.com विशेष

sangali

  • महिन्याभरात होणार जलवाहिन्यांची कामे पूर्ण र्‍ एमआयडीसीचे पाणी बंद होणार
    सांगली। दि. 27 (प्रतिनिधी)
    सतत पाणीप्रश्नाने त्रासलेल्या कुपवाड, गव्हर्मेट कॉलनी व वानलेसवाडी परिसरास येत्या महिन्याभरात पूर्ण क्षमतेने नवीन जलवाहिन्यांमधून पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीकडून घेण्यात येणारे पाणीही पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.महिन्याभरात होणार जलवाहिन्यांची कामे पूर्ण र्‍ एमआयडीसीचे पाणी बंद होणार
    सांगली। दि. 27 (प्रतिनिधी)
    सतत पाणीप्रश्नाने त्रासलेल्या कुपवाड, गव्हर्मेट कॉलनी व वानलेसवाडी परिसरास येत्या महिन्याभरात पूर्ण क्षमतेने नवीन जलवाहिन्यांमधून पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे औद्योगिक वसाहतीकडून घेण्यात येणारे पाणीही पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.
    कुपवाड गावठाणातही सध्या कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून, उपनगरांमध्ये तर पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. जुन्या पाईपलाईन बदलण्याचे काम सध्या महापालिकेने हाती घेतले आहे. कुपवाडसह रामकृष्णनगर, गोमटेशनगर, एसटी कॉलनी या परिसरात नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. या पाणी योजनेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते सहा महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. सुमारे 79 कोटींची योजना आता 130 कोटींच्या घरात गेली आहे.
    योजनेंतर्गत पाण्याच्या टाक्या व अंतर्गत जलवाहिन्यांची कामे आता पूर्णत्वास आली आहेत. येत्या महिन्याभरात कुपवाडसह आजूबाजूच्या उपनगरांत पूर्ण क्षमतेने नव्या जलवाहिन्यांमधून पाणी पुरवठा होईल, अशी खात्री महापालिकेने व्यक्त केली आहे. कुपवाडबरोबरच वानलेसवाडी व गव्हर्मेट कॉलनीतही नव्या जलवाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. सध्या वानलेसवाडीतील जलवाहिन्यांचे काम पूर्ण झाले असून, गव्हर्मेट कॉलनीत यासाठी अणखी पंधरा दिवसांचा अवधी लागणार आहे.
    कुपवाडमध्ये पूर्ण क्षमतेने पाणी पुरवठा सुरू झाल्यास औद्योगिक वसाहतीमधून घेण्यात येणारे पाणी टप्प्या-टप्प्याने कमी करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेची लाखो रुपयांची बचत होणार आहे.
  • दुष्काळामुळे साखर कारखान्यांचे गळीत धोक्यात
    अशोक डोंबाळे । दि. 27 (सांगली)
    ऊस दराबाबतची साखर कारखानदारांची मनमानी आणि जिल्ह्यावर कोसळलेल्या दुष्काळाच्या संकटामुळे जिल्ह्यातील 21 हजार 529 हेक्टर उसाचे क्षेत्र घटले आह़े पावसाने ओढ दिल्यामुळे अजूनही चार्‍यासाठी उसाची तोड सुरूच असल्याने साखर कारखान्यांचे गळीत हंगाम धोक्यात आले आहेत़दुष्काळामुळे साखर कारखान्यांचे गळीत धोक्यात
    अशोक डोंबाळे । दि. 27 (सांगली)
    ऊस दराबाबतची साखर कारखानदारांची मनमानी आणि जिल्ह्यावर कोसळलेल्या दुष्काळाच्या संकटामुळे जिल्ह्यातील 21 हजार 529 हेक्टर उसाचे क्षेत्र घटले आह़े पावसाने ओढ दिल्यामुळे अजूनही चार्‍यासाठी उसाची तोड सुरूच असल्याने साखर कारखान्यांचे गळीत हंगाम धोक्यात आले आहेत़
    जिल्ह्यातील 15 साखर कारखान्यांपैकी 2011-12 च्या गळीत हंगामात 12 कारखान्यांनी गळीत हंगाम घेतल़े या कारखान्यांसाठी गेल्यावर्षी जिल्ह्यात जवळपास 75 हजार हेक्टर उसाचे क्षेत्र होत़े म्हणूनच जिल्ह्यातील 12 कारखान्यांचे गळीत हंगाम पुर्र्ण क्षमतेने चालू राहिल़े यंदा राजारामबापू साखर कारखान्याने डफळे कारखाना, तर गणपती संघाने यशवंत कारखाना विकत घेतला आह़े दोन्ही कारखाने 2012-13 च्या गळीत हंगामात सुरू झाल्यास जिल्ह्यात 14 कारखाने गळीत हंगाम घेतील. एकाबाजूला साखर कारखान्यांची संख्या वाढली असताना दुसर्‍या बाजूला जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र 21 हजार 529 हेक्टरने घटल्याचे कृषी विभागाच्या माहितीनुसार सिध्द झाले आह़े ऊस क्षेत्र घटण्यास साखर कारखानदारांची मनमानी आणि निम्म्या जिल्ह्यात पडलेला दुष्काळ ही दोन महत्त्वाची कारणे आहेत़ 2011-12 च्या गळीत हंगामात जिल्ह्यात 75 हजार हेक्टर क्षेत्र होत़े यामध्ये 16 हजार 276 हेक्टरने घटून 2012-13 च्या गळितास 58 हजार 724 हेक्टर क्षेत्र येणार आह़े शेतकर्‍यांनी ऊस लावला नसल्यामुळे 16 हजार 276 हेक्टर क्षेत्र घटले असताना आटपाडी, कवठेमहांकाळ, जत, खानापूर, तासगाव, मिरज पूर्व भागामध्ये पडलेल्या दुष्काळात पशुधनाच्या चार्‍यासाठी पाच हजार 253 हेक्टर क्षेत्र गेले आह़े अद्यापही पाऊस पडण्याची चिन्हे दिसत नसल्यामुळे पशुधनाच्या चार्‍यासाठी वाळवा, पलूस, कडेगाव, तासगाव पश्चिम, मिरज पश्चिम भागातून उसाची तोड सुरूच आह़े
    ऊस क्षेत्र घटल्यामुळे जवळपास 20 लाख 91 हजार मेट्रिक टन ऊस जिल्ह्यातील साखर कारखान्यांना कमी पडणार आह़े दुष्काळी पट्टय़ातील माणगंगा, यशवंत, तासगाव, डोंगराई, महांकाली, डफळे साखर कारखाना सुरू करताना प्रशासनाची दमछाक होणार आह़े
    कर्नाटकचा दिलासा
    जत, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागातील दुष्काळी भागामध्ये चारा डेपोसाठी कर्नाटक राज्यातून मका आणि ऊस आणला जात आह़े यामुळे जिल्ह्यातील ऊस चारा डेपोला कमी जात आह़े कर्नाटकातून चारा मिळाला नसता, तर जिल्ह्यातील उसाची चार्‍यासाठी आणखी तोड झाली असती़ यामुळे साखर कारखान्यांचे गळीत हंगाम आणखीन धोक्यात आले असत़े
  • सांगली। दि. 27 (प्रतिनिधी)
    जिल्ह्यातील दरहजारी मुलांमागे मुलींची संख्या घटल्याने सर्वाचीच चिंता वाढली आहे. नव्या अहवालातील आकडेवारीने अनेकांना धक्का बसला. सामाजिक समतोल ठेवण्यासाठी कठोर कायद्याची गरज जाणकारांनी व्यक्त केली.सांगली। दि. 27 (प्रतिनिधी)
    जिल्ह्यातील दरहजारी मुलांमागे मुलींची संख्या घटल्याने सर्वाचीच चिंता वाढली आहे. नव्या अहवालातील आकडेवारीने अनेकांना धक्का बसला. सामाजिक समतोल ठेवण्यासाठी कठोर कायद्याची गरज जाणकारांनी व्यक्त केली.
    दरहजारी मुलींच्या घटत्या संख्येवर ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर विविध स्तरातून अनेक व्यक्ती, संघटनांनी चिंता व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती छायाताई खरमाटे म्हणाल्या की, स्त्री भ्रूणहत्त्येविषयी शासकीय आणि सामाजिक स्तरातून जनजागृती झाली पाहिज़े शासनाने मुलींसाठी आणखी सुविधा देण्याची गरज आह़े
    महिला बालकल्याण सभापती राधाबाई हाक्के म्हणाल्या की, आईच्या गर्भातच मुलीची हत्या करणार्‍या डॉक्टरवर कठोर कारवाई करण्याची गरज आह़े सुवर्णा पाटील, छायाताई पाटील यांनीही या प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त केली़
  • सांगली। दि. 27 (प्रतिनिधी)
    ‘‘उपयुक्ततावाद व चंगळवाद वाढीस लागल्याने माणूस सुखाच्या मागे धावायला लागला आहे. भोगविलासात तो फक्त स्वतर्‍चाच विचार करायला लागला. समाजातील इतर घटकांचे शोषण होत असल्याचे भान त्याला राहिले नाही. त्यामुळे परिवर्तनाची चळवळ धोक्यात आली आहे’’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी केले.सांगली। दि. 27 (प्रतिनिधी)
    ‘‘उपयुक्ततावाद व चंगळवाद वाढीस लागल्याने माणूस सुखाच्या मागे धावायला लागला आहे. भोगविलासात तो फक्त स्वतर्‍चाच विचार करायला लागला. समाजातील इतर घटकांचे शोषण होत असल्याचे भान त्याला राहिले नाही. त्यामुळे परिवर्तनाची चळवळ धोक्यात आली आहे’’, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, कथाकार प्राचार्य रा. रं. बोराडे यांनी केले.
    येथील कोल्हापूर रोडवरील दैवज्ञ समाज भवनात आज चौथे परिवर्तन साहित्य संमेलन प्राचार्य बोराडे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आनंद डावरे यांच्याहस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ कथाकार वामन होवाळ, माजी महापौर सुरेश पाटील, उद्योजक अधिकराव सदामते, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, नगरसेवक लक्ष्मण नवलाई, राहुल थोरात, प्रभाकर पत्की, नामदेव माळी, दलितमित्र अशोक पवार, संमेलनाचे स्वागताध्यक्ष सुरेश सकटे व प्रा. जगन्नाथ मोरे, प्रकाश वायदंडे, योगेंद्र थोरात आदी उपस्थित होते. तत्पूर्वी शास्त्री चौकातून काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात झाली.
    अध्यक्षीय भाषणात प्राचार्य बोराडे म्हणाल,‘‘परिवर्तन चळवळीचा व माझा तसा थेट संबंध आला नाही. मात्र परिवर्तन झाले पाहिजे, सर्व समाज एकसंध असला पाहिजे, हा आग्रह सुरुवातीपासून धरला आहे. समाजात समता, बंधुता व स्वातंत्र्य हे विचार रुजल्याशिवाय समाज पुढे जाणार नाही. पण सध्या परिवर्तन चळवळीपुढे अनेक धोके उभे आहेत. उपयुक्ततावादाने चळवळीत बाधा आणली आहे. चंगळवादाने जगण्याच्या संकल्पना बदलल्या आहेत. सुखाची कल्पना वाढीस लागली आहे. दुसर्‍याच्या शोषणाचे भान राहिले नाही.
    साहित्य हे परिवर्तनाचे माध्यम होऊ शकते का? व जे साहित्य परिवर्तनाचे माध्यम होऊ शकत नाही, त्याला साहित्य म्हणायचे का? असे दोन प्रश्न आहेत. साहित्य हे परिवर्तनाचे माध्यम होऊ शकते व ते झाले पाहिजे, असे माझे उत्तर आहे. परिवर्तनाचा हा दीप विझू देऊ नका, इतरांना दुर्‍खी करून सुख मिळवाल, तर तुम्हीही फार काळ सुखी राहू शकणार नाही’’, असेही प्राचार्य बोराडे म्हणाले.
  • सांगली। दि. 27 (प्रतिनिधी)
    अवैध धंदे बंद करण्यात सपशेल अपयशी ठरलेले व कर्तव्यात कसूरपणा करणार्‍या जिल्ह्यातील सुस्त पोलीस अधिकार्‍यांना लवकरच जिल्ह्यांतर्गत बदलीचा ‘शॉक’ बसणार आहे. या सुस्त अधिकार्‍यांचा ‘बायोडाटा’ घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. रवींद्र शिसवे बदल्यांचे नियोजन करीत आहेत. आठवडाभरात अधिकारी बदल्यांचे ‘गॅझेट’फुटण्याची शक्यता आहे.सांगली। दि. 27 (प्रतिनिधी)
    अवैध धंदे बंद करण्यात सपशेल अपयशी ठरलेले व कर्तव्यात कसूरपणा करणार्‍या जिल्ह्यातील सुस्त पोलीस अधिकार्‍यांना लवकरच जिल्ह्यांतर्गत बदलीचा ‘शॉक’ बसणार आहे. या सुस्त अधिकार्‍यांचा ‘बायोडाटा’ घेऊन जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. रवींद्र शिसवे बदल्यांचे नियोजन करीत आहेत. आठवडाभरात अधिकारी बदल्यांचे ‘गॅझेट’फुटण्याची शक्यता आहे.
    डॉ. शिसवे यांनी आपल्या कारकिर्दीत कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळताना शिस्त मोडून ‘खाकी’ची अब्रु वेशीवर टांगणार्‍या 50 पोलिसांना आजर्पयत निलंबित केले आहे. जिल्ह्यात बावीस पोलीस ठाणी आहेत. अनेक पोलीस अधिकार्‍यांच्या कामकाजावर डॉ. शिसवे यांनी नाराजी बोलून दाखविली होती.
    मे महिन्यात नव्याने अधिकारी जिल्ह्यात येतात, जिल्ह्यातून जातात व जिल्ह्यांतर्गत बदल्याही केल्या जातात. यावर्षी पाच अधिकार्‍यांची जिल्ह्याबाहेर बदली होणार होती, तर काही स्वतर्‍ जिल्हाबाहेर बदलीसाठी इच्छुक होते. या सार्‍यांना दुष्काळामुळे आणखी एक वर्ष येथे काढावे लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळे आहे त्या अधिकार्‍यांची जिल्ह्यांतर्गत बदली करण्यासाठी नियोजन सुरू आहे.
    निष्क्रिय कारभार नजरेत भरला..
    शहर व विश्रामबाग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गुन्हेगारीत वाढ झाली आहे. घरफोडी व गुन्हेगारांची दहशत मोडीत काढण्यात अपयश आले आहे. रेकॉर्डवरील मटकाकिंगनी पुन्हा मटक्याचा धंदा सुरूकेलाय. हा सारा निष्क्रिय कारभार डॉ. शिसवे यांच्या नजरेत भरला आहे. गुन्हे प्रगटीकरण (डीबी) शाखांचा कारभार कसा सुरू आहे? याची कुणकुण त्यांना लागली आहे. यामध्येही बदल करण्यासाठी त्यांचे नियोजन सुरू आहे.
  • न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन; भाजीबाजाराचा प्रश्न प्रलंबित
    मिरज। दि. 27 (प्रतिनिधी)
    मिरजेत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून भाजीविक्रेते, फळविक्रेते पुन्हा रस्त्यावर आले आहेत. विक्रेत्यांनी पुन्हा रस्ते व्यापल्याने महापालिकेची कारवाई व्यर्थ ठरली आहे.न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन; भाजीबाजाराचा प्रश्न प्रलंबित
    मिरज। दि. 27 (प्रतिनिधी)
    मिरजेत न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून भाजीविक्रेते, फळविक्रेते पुन्हा रस्त्यावर आले आहेत. विक्रेत्यांनी पुन्हा रस्ते व्यापल्याने महापालिकेची कारवाई व्यर्थ ठरली आहे.
    मिरजेत लोणीबाजार परिसरात वाहतुकीला अडथळा ठरणारा भाजीबाजार न्यायालयाने बेकायदेशीर ठरविला आहे. न्यायालयाच्या निकालानंतर महापालिकेने सहा महिन्यांपूर्वी रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांना हटविण्याची कारवाई केली होती. महापालिकेने भाजीबाजार हटविल्यानंतर विक्रेत्यांना प्रतिबंधाचे फलक लावले आहेत. मात्र भाजीविक्रीसाठी पर्यायी जागा दिली नसल्याने हटविलेल्या विक्रेत्यांनी दत्त चौक व रेवणी गल्लीत तळ ठोकला आहे.
    मिरजेत भाजीविक्रेत्यांनी पुन्हा लोणीबाजारात अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांना हटविण्याचे काम पोलिसांचे की महापालिकेचे, याचाही वाद निर्माण झाल्याने कारवाई थांबली आहे. अतिक्रमण रोखण्यासाठी गेलेल्या महापालिका कर्मचार्‍यांनीही भाजीविक्रेत्यांशी जमवून घेतल्याचे दिसत आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही मिरजेतील भाजीबाजाराचा प्रश्न संपुष्टात आलेला नाही. त्यासाठी भाजीविक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक आहे. शहरातील अन्य भागात अतिक्रमणे हटविण्यात येत असताना रस्त्यावरील भाजीविक्रेत्यांची समस्या कायम आहे. त्यामुळे या प्रश्नावर आता महापालिका काय भूमिका घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले आहे.


  • Copyright 2011-12 m4marathi.com