तेलंगणा आता स्वतंत्र
|
अनेक वर्षांच्या संघर्षानंतर वेगळ्या तेलंगण राज्याचा आज अधिकृतरित्या ‘भारताचे 29वे राज्य’ म्हणून जन्म झाला. तेलंगणचे पहिले मुख्यमंत्री म्हणून के. चंद्रशेखर राव यांनी आज सकाळी शपथही घेतली. काल मध्यरात्रीपासूनच तेलंगणमध्ये नव्या राज्यनिर्मितीचा जल्लोष सुरू झाला होता.
एकत्र आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगण आणि आंध्र प्रदेश ही दोन वेगळी राज्ये निर्माण करण्याचा ठराव संसदेमध्ये फेब्रुवारीत मंजूर झाला होता. त्यावेळी 2 जून ही दोन्ही राज्यांच्या निर्मितीची अधिकृत तारीख ठरविण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या काळातच 30 एप्रिल रोजी येथे विधानसभेसाठीही मतदान झाले. यात तेलंगणमध्ये के. चंद्रशेखर राव यांच्या ‘टीआरएस’ने अपेक्षेप्रमाणे बहुमत मिळविले. तेलंगण आणि आंध्र प्रदेश या दोन्हींसाठी हैदराबाद हीच संयुक्त राजधानी असेल. पुढील दहा वर्षांत सीमांध्राला वेगळी राजधानी उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आता नवीन राज्याची नवी आणि स्वतंत्र वाटचाल कशी असेल हे तर येणारी वेळेचं ठरवेल…