दुर्गभ्रमंती- किल्ले “रायगड”
|स्वराज्याची राजधानी म्हणुन शिवप्रभूंनी किल्ले रायगडाची निर्मिती केली.
रायगड हा अतिशय उंचावर असुन शत्रुला सहजासहजी जिंकता न येणारा किल्ला आहे.
‘रायगड’ हा शिवकालातील महत्त्वपूर्ण किल्ला होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स.१६६४ मध्ये हा गड बांधून घेतला. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याचीराजधानी म्हणजे रायगड! छत्रपती शिवाजी महाराज यांचा शके १५९७, आनंदनामसंवत्सर, जेष्ठ शु. त्रयोदशी, शनिवार (६ जून, १६७४) रोजी जो राज्याभिषेकझाला, तो याच रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसन रायगडावरच झाले.म्हणून या गडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड (कुलाबा)जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणार्या या गडाच्या सभोवताली दाट जंगले आहेत.त्यामुळे लांबून गडाचे दर्शन अतिशय विलोभनीय दिसते.
छत्रपती शिवाजीराजांची समाधी रायगडावर असून गडावर अनेक इतर ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यातविशेष करून महाराजांची सदर, दरबाराची जागा, हिरकणी बुरूज, भवानी टोक, छत्रपतींच्या वाड्याचा चौथरा, बाजारपेठेचे अवशेष इ. महत्त्वाच्या वास्तूआहेत. गडाला सुमारे १४०० पायर्या आहेत. ज्या शिवभक्तांना गडावर चालत जाणेशक्य नाही, अशांसाठी आता ‘रायगडावर’ रोपवेची सोय करण्यात आली आहे. गडावरराहण्याची व भोजनाची उत्तम प्रकारे सोय आहे. गडाच्या पायथ्याशी पाचडलामातोश्री जिजाबाईंची समाधी आहे. महाडपासून २७ कि. मी. अंतरावर असणार्यारायगडावर जाण्यासाठी महाडपासून गाड्यांची सोय आहे. श्रेष्ठ समाजसुधारकमहात्मा जोतिबा फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला, तसेचलोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची येथूनच सुरुवात केली.