दुर्गभ्रमंती- किल्ले “विशाळगड”

विशाळगड –vishalgad
स्वराज्यातील गाड्कील्ल्यांमधील अजुन एक महत्वाचा किल्ला म्हणजे विशाळगड.
कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड हा १३४४ फूट उंचीवर असून गडाचे आवार सुमारे ३ कि. मी. लांब व १ कि. मी. रुंद आहे. गडावर महादेवाचे देऊळफुलाजी व बाजीप्रभु यांच्या समाधीराजाराम महाराजांच्या पत्नी आहिल्याबाईंचे (अंबिका) स्मारकसरकारवाडापिराचा दर्गाभोपाळ तळे इ. ऐतिहासिक वास्तू आहेत. गडावर जाण्यासाठी पाऊलवाट आहे. पावसाळ्यात गडावरून आजुबाजुचे निसर्ग सौंदर्य हे अधिकच चांगले दिसते. विशाळगड हा पन्हाळ्यापासून सुमारे ४९ कि. मी. अंतरावर आहे. पावसाळा वगळता गडाच्या पायथ्यापर्यंत एस.टी. जातात. जवळच गजापुरची पावनखिंड आहे. पर्यटकांसाठी गडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूर’ या गावात मुक्कामाची सोय होऊ शकते.

विशाळगडाचे नाव ऐकताच समोर येतो तो बाजीप्रभू देशपांडे यांचा घोडखिंडीतील पराक्रम. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तेथील तोफेचा आवाज कानी येईपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंडीत शौर्याने शत्रुला रोखले. शेवटी त्यांच्या हौतात्म्याने घोडखिंडीची पावनखिंड’ झाली.अनेक गिर्यारोहक या गडाला भेट देतात. शिवकाळातील इतिहासाचीबाजीप्रभूंच्या पराक्रमाची आठवण म्हणून आजही असंख्य तरुणइतिहासप्रेमीगिर्यारोहक पन्हाळा – ते – विशाळगड असा प्रवास करतात.
2 Comments