रतनगड
|‘रतनगड’, रतनवाडी, ता. अकोले जि. अहमदनगर येथील हा किल्ला गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि साहसी चढाई करण्याची आवड असणाऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे. ४३०० फुट उंच असलेला हा गड समुद्रसपाटीपासून ३५२३ फुट उंचीवर आहे. गडावर जाण्यासाठी पायथ्याशी असलेल्या रतनवाडीहून जाता येते. रतनवाडीला संगमनेरहुन-अकोले-राजुर-भंडारदरामार्गे जाता येते.
हा किल्ला कोळी सरदार जावजी यांनी १७६३ साली ताब्यात घेतल्याची सरकार दप्तरी नोंद असून हा किल्ला म्हणजे एक महत्वाचे ठाणे मानले जाई. १८२० साली कॅप्टन गॉर्डनने किल्ला ताब्यात घेतल्या नंतर १८२४ साली आदिवासी सेनानी रामोजी भांगरेंनी पुन्हा ताब्यात घेतला.
हा गड अतिशय प्रेक्षणीय असून पूर्ण गड चढण्यासाठी अनेक ठिकाणी साहस आणि धैर्य अंगी असणे महत्वाचे आहे.
किल्ल्यावर गणेश दरवाजा, रत्नादेवीची गुहा, मुक्कामाची गुहा, देवीदेवतांची शिल्पे कोरलेला प्रमुख दरवाजा, गडावरील जुन्या इमारतींचे अवशेष ज्याला इमारतींचे जोतेही म्हणतात, कडेलोट स्थळ, राणीचा हुडा म्हणून ओळखला जाणारा भग्न बुरुज, प्रवरा नदीचे उगमस्थान, मोर्च्याची ठिकाणे आणि बुरुज, अंधारकोठी आणि त्यातील पिण्यास योग्य असलेले मधुर पाण्याचे तळे, खडकाला आरपार भगदाड असलेले गडावरील अत्युच्च ठिकाण जे नेढा म्हणून ओळखले जाते आणि कल्याण दरवाजा हि प्रेक्षणीय ठिकाणे आहेत.
गडावर राहण्याच्या सोयीसाठी दोन गुहा असून ३०-३५ लोक मुक्काम करू शकतात आणि पिण्याचे पाणीही उपलब्ध आहे. खाण्याची व्यवस्था मात्र गडावर नाही. गडावर जाण्यासाठी रतनवाडी, कुमशेतच्या शिवकालीन मार्गाने किंवा साम्रदहून जाता येते.
मुंबई किंवा नाशिकहून इगतपुरी-घोटी मार्गे भंडारदरा धरणाला वळसा घालून रतनगडला पोहोचता येते. रतनवाडीहून गड तीन तासांच्या अंतरावर आहे.
about ratangad
रतनगड’, रतनवाडी, ता. अकोले जि. अहमदनगर येथील हा किल्ला गिर्यारोहक, निसर्गप्रेमी आणि साहसी चढाई करण्याची आवअसणाऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे