वाटणी
|सकाळ-सकाळी दोन्ही सुना आज लागल्या कल-कलू ,
गप्प बसलेले नवरे आता मधेच लागले बोलू .
बोलता-बोलता हमरी-तुमरी बाचा-बाची वाढली ,
धाकय्यान मग एक नवीच युक्ती शोधून काढली .
म्हटला एकमात्र दादा आता आपल काही पटणार
नाही आणि वाटणी केल्या शिवाय आपल्या घराचा
प्रश्न काही मिटणार नाही .
थोरल्यानही होकार दिला पंचायात बोलवायला
निघून गेला पन्नास वर्षांचा संसार त्यांचा
अंगणात यांनी जमा केला .
झाला कारे सगळ वाटून सरपंचाने प्रश्न केला ,
वाघाद्ल्या सारख करत थोरला हळूच बोलून गेला ,
म्हटला , बाबांचा दवाखाना मला काही पेलणार नाही ,
म्हणून त्याच्याकडे द्या बाबा माझ्याकडे घेतो आई .
ऐकून त्याच बोलन , त्या दोघांच्या कालीजच फाटलं,
पोटाच्या पोरांनच , स्वतः आज जन्मदात्याना वाटल
पन्नास वर्षाच्या दृश्य डोळ्या समोर तरू लागल
कळवळणार मन त्याच विधात्याला म्हणू लागले ,
देवा , असल्या दिवस दावण्या अगोदर आम्हालाच का उचलून नेल नाही ?
अरे पोटी पोर देण्या पेक्षा वाझोटच का केला नाही ?
-धनगर विपुल शांताराम