तुकोबारायंची पालखी २९ जूनला मार्गस्थ होणार….
पावसाळा सुरु झाला की वारकऱ्यांना वेध लागतात पंढरपूरच्या वारीचे. पावसाळ्यातच येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात लाखो भाविक पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होतात. दरवर्षी लाखो वारकरी ‘ज्ञानबा तुकाराम’चा गजर करीत, अभंग म्हणत, प्रवचन-कीर्तन करीत पंढरपूरकडे पायी मार्गस्थ होतांनाही दिसतात. त्यांना साथ असते ती जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची. संत तुकाराम महाराजांची पालखी त्यांचे गाव श्रीक्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे मार्गस्थ होते, तर संत ज्ञानेश्वरांची पालखी श्रीक्षेत्र आळंदी येथून. यंदाच्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा कार्यक्रम जाहीर झाला असून पालखी परंपरेप्रमाणे ज्येष्ठ कृष्ण सप्तमीला म्हणजेच २९ जून रोजी देहूतून पंढरपूरकडे मार्गस्थ होईल. पालखीचा पिंपरीतील मुक्काम रद्द करण्यात आला असून पुणे आणि इंदापूर येथे दोन दिवस मुक्काम ठेवण्यात आला आहे. आषाढ शुक्ल एकादशीला, १९ जून रोजी पालखी पंढरपुरात दाखल होईल. तेथे चार दिवस मुक्काम करून पालखी २२ जूनला परतीचा प्रवास सुरु करेल.
Related Posts
-
पाण्याच्या योग्य नियोजनाने केली दुष्काळावर मात….
No Comments | Aug 3, 2013 -
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आणि आजची परिस्थिती
No Comments | Aug 29, 2013 -
चुलत भावाने पैश्यांसाठी अपहरण करून भावाचा केला खून
No Comments | May 15, 2013 -
राष्ट्रीय पारितोषिक विजेते दिग्दर्शक राजीव पाटील यांचे अकाली निधन….
No Comments | Sep 30, 2013
तुकाराम यांच्या चरित्र गाथेवर `तू का राम मी का नाही "ही सीडी आवश्य बघा!
पालखी